Saturday, 4 August 2012

अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले...

तू आज जाते म्हणताना माझे डोळे अचानक पानावाले
अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले
तू जाणार म्हटल्यावर उगाच मन कासाविस झाले
जणू शुभ्र आकाश काळ्या मेघांनी ग्रासले

तू जातांना आज तुला डोळ्यात साठावावेसे वाटले
अन ते क्षण डोळ्यातच बंदिस्त करावेसे वाटले
तू थाम्बनार नाहीस, मागे फिरणार नाहीस माहित होते
तरी तु मागे फिरशील असे का मला वाटले?

तू आज जताना जिवाच्या आकाग्शाने थाम्ब म्हटले
तुझ नाव घेउन तुला शंभर वेळा पुकारले
तुला माझा आवाज एईकुच गेला नहीं का ?
की ... तेव्हा मी नाहीं माझे मन आक्रन्दले होते का ?

तू जाताना माझे डोळे बरच काही बोलून जातात,
मनातले अलगुज़ हळूच उघडून देतात,
तुला कधीच काही कळल नाही याची खंत आहे,
अन हाच माझ्या अवद्न्याचा अंत आहे,

कुणीतरी असावे.....

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार

मलाही girl friend मिळावी...

मलाही girl friend मिळावी...!

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

तुझ्याशी नाही रे..

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
 किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे..

प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात..
ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..?
नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात..
स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात..
अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१||

तुझ्याशी नाही रे..
 मला स्वतःशीच भांडायचं आहे..

कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे..
सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे..
बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे..
माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे..
धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..

सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार
मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार..
शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे..
आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे..
अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. !

हवी होती फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं .

कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं.....

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं

आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

मृत्यु तुझा मी ....

आला दारात माझ्या
बोलला आपटून काठी
चल तयार हो आता
मृत्यु तुझा मी ....
आलो तुझ्याच साठी

माझ्या चेहऱ्यावरचं...
समाधानाचं हसूं पाहुन
भ्रमित बिचारा मृत्यु तो
बोलला आवाज पाडून....

मला पाहून भल्याभल्यांची
अशी काही बोबडी वळते...
तू भेटलास पहिलाच असा
ज्याच्या गाली खळी पड़ते...

सांगितले मी त्याला
जीव सगळा एकवटून
आणखी किती मारशील मला
जीव गेलाय आधीच विरून ....
रोज तिच्या आठवणीत इथे मी
मरत आहे झुरून झुरून...

बस इथे उशाशी माझ्या
बनव ह्या खाटेला आता
तू माझीच मृत्युशैय्या
थकलो होतो किती मी
वाट पाहून तुझी वेड्या
सुरु कर तू काम तुझे...बघ
उरल्या घटका किती थोड्या

"जशी तुझी इच्छा" म्हणून
मृत्युने घेतले मला सामावून....
झाला एकरूप माझ्याशी...
अगदी काही क्षणासाठी...

तुझ्या विरहाचे भाले....
तुझ्या आठवणींच्या कट्यारी ..
झेलल्या त्याने ही उभारी...
लागल्या जेव्हा जिव्हारी...
आली ऐकू त्याची किंकाळी...
पुढच्याच क्षणी जखमी मृत्यु...
मला सोडून बाहेर पडला...

एक हात जखमेवर धरून..अस्पष्टसा बोलला...
"अरे कसले हे प्रेम आणि कसल्या त्या आठवणी
माझ्या क्रौर्याची परिसीमाही आज ओलांडली त्यांनी
तुझ्या रोजच्याच मरणाला...आज मी ही अनुभवलं
राम राम माझा तुला...तुझ्या दारी येण गडया.... मला नाही परवडलं "

खरचं यार प्रेम बिम काही नको...

प्रेम नको...


खरचं यार प्रेम बिम काही नको...
बस...आता सगळं पुरे झालं..
कोणासाठी तिष्ठणं नको...
आजवर झालेलं पुरे झालं..
डोळ्यांत दाटलेलं पाणी नको..
अन आभाळात ओघळता मेघ नको
रात्र रात्र जागणं नको...
त्याच जुन्या पायवाटांवर चालणं नको..
बस...आता सगळं पुरे झालं..
आता प्रेम बिम काही नको...
उगाचच लिहीणं काहीही...निरर्थक..
उगाचचं वाचणं...तेच...पुन्हा पुन्हा..
आता ह्यातलं.. काहीच नको
बस...बस..मी अन मीच...
बाकी प्रेम बिम काहीच नको

शेवटचा निश्वास,,,,

शेवटचा निश्वास

संपला सारा खेळ् प्रेमाचा
उरले फ़क्त आठवणींचे अवशेष
दुर् गेल्या वाटा सुखाच्या
काहीच न राहीलेलं शेष

कधी केव्हा कुठे कसा
पण खुप जीवं लागला होता
त्यांच्या गंधाने माझ्या मनीचा
सारा आसमंत भारला होता

प्रेम निरपेक्ष असतं
म्हणणारी लोकं भेटली
करताना मात्र असं प्रेम
माझी अघोरी तडफ़ड झाली.

वाळवंटातल्या म्रुगजळागत
होता का सारा आभास
उडुन गेले स्वप्नील रंग आयुष्याचे
उरला हवेत शेवटचा निश्वास

Marriage scrap

तिला माझ्या कविता खूप आवडायच्या ..

तिला  माझ्या  कविता खूप आवडायच्या 
कुणाच्या नसोत  पण
तिच्या कमेंट्स  अगोदर असायच्या ....

मी  एक  दु:ख कवी
दु:खीच कविता करायचो

तिला  माझ्याकडून  तिच्यावर
कविता  हवी होती
शब्दच  सुचत नव्हते मी काय तिच्यावर लिहावे
प्रश्न  वेड्या मनाला  पडला होता
तिला  हि तू रडक्याच  शब्दांत  मांडणार..??

तीच  माझी  होती प्रेक्षक  पहिली
तिच्यामुळेच  तर  कवितेत  गोडी  यायची
लिहायचे  तरी काय
मला  समजतच नव्हते
शब्द  कोणते   जे हसू  ओठांवरी आणतील
ते  शब्दच मिळत नव्हते
लिहले  मी ते पुढे आले मग  ओठी ....

तू  असताना  कुणी नकोसे  वाटतं
तू  बोलताना माझे मन जाग्यावरच न थांबतं
नाजूक  अन  गोड तुझ्या आवाजाने 
माझे मन आकाशी उंच उडू लागतं

हसतेस  जेव्हा तू सूर तालांनी गीत  चालते
मन  माझे  त्यात  डुलू लागतं
तुझ्या माझ्या मैत्रीत जरा  गुपितच आहे
लांब  जरी आहोत तरी
आमच्यात ओढ भेटीची  आहे

थोडा वेळ कधी न बोलता  राहू शकत नव्हतो
एकमेकांना त्याचा जाब विचारायचो
आपली हि मैत्री अशीच निरंतर रहावी

झाली बघ  कविता हि फक्त तुज जवळ पोहचावी
प्रतिक्रिया तुझी ती येऊ दे लवकरच
मैत्री आपुली आज भेट घडून यावी

पाहतोय मी वाट तू हसतच जवळ यावी
मैत्री हि आपुली ह्या कवितेनेच मांडावी
मैत्री आपली ह्या शब्दांनीच सांगावी......

हि कविता माझी
बघ तुज साठीच आहे ....

मिटलेली मैत्री...

मिटलेली मैत्री
मिटलेलीच असू द्यावी
उमलली कधी तर
अलगद उमलू द्यावी

मिटलेपणात ही
ती मैत्रिच असते
सुखद स्मृतीचे
पराग हुंगित असते

उचकटून तिला
उगा मरू नको
जपला गंध कोष
उगा जाळू  नको

मागुन कुणालाच
कधी मैत्री मिळत नाही
वठलेल्या फांदीवर
फुल कधीच उमलत नाही

ज्याला लोक
जमवलेली मैत्री म्हणतात
त्यांच्या  डोक्यात फ़क्त
फायद्याचे हिशोब असतात

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...