Monday, 17 June 2013

दूर गेलीस तरी तुझी आठवण मी नेहमी करत राहील ..

तू माझ्या पासून दूर गेलीस तरी तुझी आठवण मी नेहमी करत राहील ..

काय माहीत जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली परत भेट होईल ..

भेटशील कधी मला तर तुझ्याशी दोन शब्द बोलायला मी तयार राहील ..

विसरू नका मला कधीच तु माझी नसलीस तरी मी तुझाच राहील ..

तुझी वाट बघता बघता …


तुझी वाट बघता बघता …
रस्ता तेवढा संपला,
तू तर आलीच नाहीस …
पण अपघात मात्र घडला…
यायचंच नव्हत तुला …
हे मी समजून घ्यायला हवं होतं,
वेळ नसल्याचा तूझं कारण …
मला genuine वाटलं होतं…
तू सोबत असतीस ,
तर मला माझ्याही आधाराची गरज नव्हती,
तू फक्त सोबत असावी ,
एवढीच माझी इच्छा होती …
मी तुझी वेड्यासारखी वाट पाहत होतो…
हे मला आत्ता पटलं ,
तुला मात्र अजूनही …
माझं मन नाही कळलं …
वाट पाहून तुझी …
मला वाटतं आत्ता काही उपयोग नाही ….
पण या मनाला कोण समजावत बसणार …
ते माझं ऐकतच नाही ….

गरज म्हणून'नातं'कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..

मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं'म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक'नातं'जप.. मध्येच माघार घेऊ नकोस

Saturday, 4 August 2012

अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले...

तू आज जाते म्हणताना माझे डोळे अचानक पानावाले
अन नकळतच दोन थेम्ब गालावर उतरले
तू जाणार म्हटल्यावर उगाच मन कासाविस झाले
जणू शुभ्र आकाश काळ्या मेघांनी ग्रासले

तू जातांना आज तुला डोळ्यात साठावावेसे वाटले
अन ते क्षण डोळ्यातच बंदिस्त करावेसे वाटले
तू थाम्बनार नाहीस, मागे फिरणार नाहीस माहित होते
तरी तु मागे फिरशील असे का मला वाटले?

तू आज जताना जिवाच्या आकाग्शाने थाम्ब म्हटले
तुझ नाव घेउन तुला शंभर वेळा पुकारले
तुला माझा आवाज एईकुच गेला नहीं का ?
की ... तेव्हा मी नाहीं माझे मन आक्रन्दले होते का ?

तू जाताना माझे डोळे बरच काही बोलून जातात,
मनातले अलगुज़ हळूच उघडून देतात,
तुला कधीच काही कळल नाही याची खंत आहे,
अन हाच माझ्या अवद्न्याचा अंत आहे,

कुणीतरी असावे.....

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार

मलाही girl friend मिळावी...

मलाही girl friend मिळावी...!

सुंदर मुलीशी ऒळख व्हावी,
आम्हा दोघांची मने जुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

हास्याच्या पहिल्या किरणाने,
प्रितीची खळी उमलावी ।
डोळ्यात जिच्या ऐश्वर्य असावे,
रूपाची ती राणी असावी ॥
अशीच माझी स्वप्नसुंदरी,
ह्र्दयाच्या नगरात रुळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

चौपाटीवर पाणीपूरीतून,
प्रणयाचेच घास भरवू ।
रिक्षात मीटरला साक्षी मानून,
प्रेमाच्याच शपथा घेऊ ॥
आयुष्यातील सारी दु:खं,
जिच्या सहवासात टळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी ॥

द्वीधा मनं मग मध्येचं म्हणत,
आधी girl की आधी friend ।
आयुष्यभराचं नातं हवं,
देव करो तीच्याकडूनचं,
प्रेमाची ख्ररी व्याख्या कळावी ।
हातात हात घालून फ़िरणारी,
मलाही girl friend मिळावी...!

तुझ्याशी नाही रे..

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
 किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे..

प्राजक्त असून दारी, फुले शेजारीच पडतात..
ज्यांचा आहे तिटकारा, असेच प्रसंग का घडतात..?
नशिबाचे उधळलेले वारु, अचानक अडतात..
स्वप्नांचे इमले वास्तवात न येताच मोडतात..
अवाजवी अपेक्षांचं आता इथंच सांडायचं आहे... ||१||

तुझ्याशी नाही रे..
 मला स्वतःशीच भांडायचं आहे..

कर्तव्याचं भान सोडून, थोडं मनमुराद जगायचं आहे..
सगळ्या जगाला विसरुन, फक्त माझ्याकरता काही मागायचं आहे..
बंधनं झुगारुन सगळी, बिनधास्त वागायचं आहे..
माझं जीवनगीत मला, माझ्याच सुरात गायचं आहे..
धुंद श्रावणलहरींमध्ये.. वारा पिऊन, बेफाम हिंडायचं आहे.. ||२ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..

सुख दुखाःचा ऊन-पाऊस, आशा निराशेचे चढ-उतार
मूक संवेदनांचे हुंकार आणि कल्पनेने छेडलेली.. हृदयीची तार..
शतरंगी भावनांचे पदर, अलवार उलगडणार आहे..
आयुष्याच्या रंगमंचावर, कलंदर बनून बागडणार आहे..
अस्तित्वाच्या क्षितिजावर यशाचं तोरण बांधायचं आहे.. ||३ ||

तुझ्याशी नाही रे..
मला स्वतःशीच भांडायचं आहे..
कसं जगायचं..?
किती सोसायचं..?
 याचं गणित स्वतःशीच मांडायचं आहे.. !

हवी होती फक्त दोन अक्षरं...

हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'
'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी
धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या
वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर
गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर
हवी होती फक्त दोन अक्षरं .

sukanya samriddhi yojana interest rate

  एसएसवाई(SSY) - सुकन्या समृद्धि योजना अकाउंट   सुकन्या समृद्धि योजना (Sukanya Samriddhi Yojana) एक निवेश योजना है जो भारतीय सरकार द्वारा ...